कोल्हापूर, दि. 26 (जि.मा.का) - आपत्ती
व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये जिल्ह्यात कोविड -19 विषाणू प्रतिबंधासाठी
आदेश लागू करण्यात आले आहेत. प्रतिबंधात्मक आदेश कालावधीत जीवनावश्यक व अत्यावश्यक
बाबींची वाहतूक सुरळीत रहाण्यासाठी नागरी व ग्रामीण क्षेत्रात पासेस देण्यासाठी
पोलीस अधिकारी यांना प्राधिकृत केले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी
दिले आहेत.
प्रतिबंधात्मक आदेश
कालावधीत अत्यावश्यक बाबींची वाहतूक त्याच प्रमाणे संबंधीत व्यक्ती व संस्था संचारबंदीत
बाहेर जाण्यासाठी त्यांचा निवास किंवा अस्थापना ज्या पोलीस स्टेशनच्या
कार्यक्षेत्रात आहे, त्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांकडे विनंती अर्ज केल्यानंतर
विनंती अत्यावश्यक कारणासाठी आहे, याबाबत खातरजमा करुन ठरविक कालावधीसाठी संबंधीत
पोलीस अधिकारी वाहन परवाना किंवा पासेस देण्याची कार्यवाही करतील. पासेस देताना
मर्यादीत स्वरुपात देण्यात येऊन संचारबंदीचे उल्लघन येणार नाही याची दक्षता
संबंधीत अधिकारी यांनी घ्यावयाची आहे.
जिल्हास्तरावर
जे शासकीय अधिकारी - कर्मचारी अत्यावश्यक सेवा व आपत्ती व्यवस्थापन कामकाजात
सहभागी आहेत, याची यादी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे प्राप्त झाल्या नंतर
निवासी उपजिल्हाधिकारी या यादीची खातरजमा करुन संबंधीत अधिकारी - कर्मचारी यांना पासेस
व वाहन परवाने देण्याची कार्यवाही करतील. तालुकास्तरावर जे शासकीय
अधिकारी-कर्मचारी अत्यावश्यक सेवा व आपत्ती व्यवस्थापन कामकाजात सहभागी आहेत, याची
यादी तहसिलदार कार्यलयास प्राप्त झाल्या नंतर या यादीची खातरजमा करुन संबंधीत
अधिकारी - कर्मचारी यांना पासेस व वाहन परवाने देण्याची कार्यवाही तहसिदार करतील.
सर्व ॲम्बुलन्स,
आरोग्य सेवेतील शासकीय वाहने, पोलीस वाहने, डीव्ही कार, न्यायाधीश, तहसिलदार,
उपविभागीय दंडाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी यांच्या वाहनांना वाहन परवान्यांची गरज
असणार नाही, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.