कोल्हापूर,दि.20 (जि.मा.का.) :सैन्य तथा सशस्त्र
दलातील वीरमरण आलेल्या महाराष्ट्र राज्याचे अधिवाशी असणाऱ्या शहीद जवानांच्या
वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता व कायदेशीर वारस यांना दोन हेक्टर शेतीयोग्य सरकारी
जमिनी वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हा
सैनिक कल्याण अधिकारी सुभाष सासने यांनी कळविले आहे. .
वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता व
कायदेशीर वारस (ज्यांनी अद्याप सरकारी जमीन मागणीसाठी अर्ज सादर केले
नाहीत) त्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावेत. अर्जासोबत आधार
कार्ड, स्वत:चा मोबाईल नंबर, डिसचार्ज पुस्तक, ओळख पत्र, पी. पी. ओ. ची छायांकित
प्रत घेऊन यावे.
अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कार्यालय,
कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक 0321-2665812 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.