कोल्हापूर,
दि. 23 (जि.मा.का.): नोंदणी व मुद्रांक विभागाच्या राज्यातील अधिकारी,कर्मचाऱ्यांकडून
जिल्हयातील पूरग्रस्तांसाठी 4 लाख 29 हजार 660 रूपयांच्या निधी जमा केला असून या निधीतील
2 लाख रुपयांचा धनादेश कोल्हापूरचे सह जिल्हा उपनिबंधक एम.एम.जाधव यांनी आज जिल्हाधिकारी
दौलत देसाई यांच्याकडे सुपूर्द केला.
शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कोल्हापूर,
परभणी, जालना, बीड, भंडारा, जळगाव, नांदेड, लातूर व मुंबई जिल्ह्यातील अधिकारी,कर्मचाऱ्यांनी
कोल्हापूर जिल्हयातील पूरग्रस्तांसाठी 4 लाख 29 हजार 660 रूपयांची आर्थिक मदत जमा केली
असून हा निधी पूरग्रस्तांसाठी दिल्याचे सह जिल्हा उपनिबंधक एम.एम.जाधव यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरस्थितीत नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना
मदत म्हणून नोंदणी व मुद्रांक विभागातील कोल्हापूर, परभणी, जालना, बीड, भंडारा, जळगाव,
नांदेड, लातूर व मुंबई जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एक दिवसाच्या पगाराशिवाय
अतिरिक्त मदत म्हणून 4 लाख 29 हजार 660 रूपये रक्कम जमा केली आहे. त्यापैकी सिध्दगिरी महाराज, कणेरी मठ यांच्याकडे 2 लाख
29 हजार 660 रूपये व आपत्ती सहायता निधी म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे
2 लाख रूपये रक्कमेचा धनादेश सुपूर्द केला. जिल्हयातील पूरग्रस्तांसाठी निधी जमा करण्याकरिता
कोल्हापूरचे सह जिल्हा निबंधक एस.एम.जाधव यांनी व्यक्तीश: संपर्क साधून नोंदणी व मुद्रांक
विभागातील अधिकारी,कर्मचाऱ्यांना पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले होते.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.