शनिवार, ७ सप्टेंबर, २०१९

राधानगरीतून 7112 विसर्ग 66 बंधारे पाण्याखाली



           
कोल्हापूर, दि. 7 (जि.मा.का.) : राधानगरी धरणाच्या 4 स्वयंचलित दरवाज्यामधून 7112 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु  आहे.
पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सायंकाळी 5 वाजता 37 फूट 1 इंच असून जिल्ह्यातील 66 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.   राधानगरी धरणात आज अखेर 8.36 टीएमसी पाणीसाठा आहे.
            पंचगंगा नदीवरील- राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर हे 7 बंधारे पाण्याखाली आहेत. भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे,  खडक कोगे व शिरगाव हे 5 बंधारे पाण्याखाली आहेत.  तुळशी नदीवरील बीड व आरे व बाचणी हे 3 बंधारे पाण्याखाली आहे. कुंभी नदीवरील  कातळी, सांगशी, शेणवडे, कळे, मांडुकली व वतवडे हे 6 बंधारे पाण्याखाली आहेत. कासारी नदीवरील यवलुज, ठाणे -आवळे, पुनाळ- तिरपण, वालोली, बाजारभोगाव व करंजफेण  हे 6 बंधारे पाण्याखाली आहेत. धामणी नदीवरील  सुळे व आंबर्डे हे 2 बंधारे पाण्याखाली आहेत. वारणा नदीवरील चिंचोली, माणगांव, दानोळी, मांगले सावर्डे, कोडोली, चावरे, तांदूळवाडी, शिरगाव व खोची हे 9 बंधारे पाण्याखाली आहे. दुधगंगा नदीवरील दत्तवाड, सिंध्दनेर्ली, सुळकुड, बाचणी, सुळंबी, तुरंबे व वाळवा  हे 7 बंधारे पाण्याखाली आहेत.  वेदगंगा नदीवरील  गारगोटी, म्हसवे, निळपण, वाघापूर, शेळोली, कुरणी, बस्तवडे व सुरुपली  हे 8 बंधारे पाण्याखाली आहेत. 
          जिल्ह्यातील धरणांमधून क्युसेकमधील होणारा  विसर्ग पुढीलप्रमाणे - वारणा- 14851, तुळसी- 1521, कुंभी-1550, कासारी-950, दूधगंगा-13200आणि कोयना-54380 क्युसेक. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.