कोल्हापूर, दि. 5
(जि.मा.का.) : अलमट्टी धरणातून 109366 क्युसेक तर
राधानगरी धरणातून 7112 क्युसेक व कोयणेतून 87338 क्युसेक पाण्याचा विसर्ग
सुरु आहे, राधानगरी धरणाचे स्वयंचलित 4 दरवाजे उघडले आहेत, अशी माहिती पंचगंगा
पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी आज
दिली.
पंचगंगा नदीची
राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी
7 वाजता 26.8 फूट असून, 32 बंधारे
पाण्याखाली आहेत. राधानगरी धरणात आज अखेर 8.35 टीएमसी पाणीसाठा आहे. जंगमहट्टी,
घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव, चिकोत्रा, कासारी व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण
क्षमतेने भरले आहेत.
पंचगंगा
नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे 7
बंधारे पाण्याखाली आहेत. भोगावती नदीवरील
हळदी, शिरगाव, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे हे 5 बंधारे पाण्याखाली आहेत. कासारी नदीवरील करंजफेण,
बाजारभोगाव,वालोली,पुनाळ- तिरपण,ठाणे आवळे व यवलुज हे 6 बंधारे पाण्याखाली आहेत. वारणा नदीवरील चिंचोली व माणगांव हे 2
बंधारे पाण्याखाली आहे. दुधगंगा नदीवरील सिंध्दनेर्ली,बाचणी,सुळंबी व दत्तवाड हे 4
बंधारे पाण्याखाली आहेत. वेदगंगा नदीवरील गारगोटी, म्हसवे, निळपण व वाघापूर हे 4
बंधारे पाण्याखाली आहेत. कुंभी नदीवरील कातळी,सांगशी व शेणवडे हे 3 बंधारे पाण्याखाली
आहेत. तुळशी नदीवरील बीड हा 1 बंधारा
पाण्याखाली आहे. नजिकच्या अलमट्टी धरणात 118.727
टीएमसी पाणी साठा आहे, तर कोयना धरणात 104.72 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे
पाणीसाठा आहे. तुळशी 3.40 टीएमसी, वारणा 34.30
टीएमसी, दूधगंगा 25.15 टीएमसी, कासारी 2.68 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी,
कुंभी 2.64 टीएमसी, पाटगाव 3.72 टीएमसी, चिकोत्रा 1.52, चित्री 1.88 टीएमसी,
जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी,
जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी असा आहे.
बंधाऱ्यांची
पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 26.8 फूट, सुर्वे 26.4 फूट, रुई 55.3 फूट,
इचलकरंजी 52 फूट, तेरवाड 45.6 फूट, शिरोळ 37.9 फूट, नृसिंहवाडी 35.9 फूट, राजापूर 24
फूट तर नजीकच्या सांगली 16.3 फूट आणि अंकली
18.5 फूट अशी आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.