कोल्हापूर,
दि. 20 (जि.मा.का.) : नागरिकत्व सुधारणा व दुरूस्ती कायदा संदर्भान्वये होणारे आंदोलन,
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ विविध संघटना
यांच्याकडून होणारे वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन तसेच विविध पक्ष / संघटनांकडून त्यांच्या
विविध मागण्यांसाठी वारंवार होणारी आंदोलने या कारणामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था
राखण्याकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये
अपर जिल्हादंडाधिकारी भाऊ गलांडे यांनी दिनांक 30 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत
जिल्ह्यामध्ये बंदी आदेश जारी केला आहे.
कलम 37 (1) अ ते फ - शस्त्रे, बंदुका, सोटा,
तलवारी, भाले, सुऱ्या, लाठी अगर काठी किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशा
कोणत्याही वस्तू बरोबर नेणे. कोणताही ज्वालाग्राही पदार्थ अगर स्फोटके पदार्थ वाहून
नेणे. दगड अगर तत्सम शस्त्रे साठविणे अगर सहज फेकून त्याचा मारण्यासाठी उपयोग करणे.
व्यक्ती अगर त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन दहन करणे. सार्वजनिक घोषणा करणे, गाणी
म्हणणे आणि गाणी अथवा वाद्ये वाजविणे. असभ्य हावभाव करणे, ग्राम्यभाषा करणे, सभ्यता
व निती विरूध्द निरनिराळ्या जातीच्या नैतिक भावना दुखावल्या जाऊन त्यांच्यामध्ये भांडणे-बखेडे
निर्माण होऊन शांततेस अगर सुव्यवस्थेस बाधा येईल अशी सोंगे अगर कोणताही जिन्नस तयार
करणे व त्या-चा प्रसार करून उपयोग करणे.
कलम
37 (3) - जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव जमणेस,
मिरवणुका काढणे व सभा घेणे.
हा हुकुम
ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तत्ये व अधिकार बजाविणे संदर्भात उपनिर्दिष्ट वस्तू
हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधिक्षक, कोल्हापूर
अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पेालीस निरीक्षक किंवा सक्षम
पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जातीधर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा
शांततामय मार्गाने साजरे करण्याकरिता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक
समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादींना लागू पडणार नाही.
हा आदेश
दिनांक 30 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अंमलात राहील.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.