इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, २६ डिसेंबर, २०१९

संविधान साक्षर ग्राम अभियानाचा समारोप



कोल्हापूर, दि. 26 (जि.मा.का.) :सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत वडणगे येथे  संविधान साक्षर ग्राम अभियानाचा समारोप करण्यात आला.
            या अभियानांतर्गत गावात स्वच्छता अभियान, सांडपाणी व्यवस्थापन, बार्टी तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती, कृषी संदर्भात असणाऱ्या योजनेचा कार्यक्रम, स्मशानभूमी येथे वृक्षारोपण, माविम अंतर्गत असणाऱ्या महिला बचत गटांसाठी असणाऱ्या योजनांचा कार्यक्रम, आरोग्य शिबिर, समाज कल्याण अंतर्गत असणाऱ्या योजनांचा कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा, व्यसनमुक्ती निमित्त रॅलीचे आयोजन, रक्तदान शिबिर, निबंध स्पर्धा, मानवतेची शिकवण प्रबोधनात्मक कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम, संविधान वाचन कार्यक्रम असे अनेक उपक्रम राबविण्यात आले.
            कार्यक्रमास प्रांताधिकारी वैभव नावडकर, समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, माजी जिल्हा परिषद सदस्य बी. एच. पाटील, सरपंच सचिन चौगले, उपसरपंच दीपक व्हरगे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे, जिल्हा समन्वयक आशा रावण, देवी पार्वती शाळेचे मुख्याध्यापक पी. के. पाटील, सर्व शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक,तलाठी जे. डी. पवार ,ग्रामसेवक प्रकाश बागुल, प्रकाश चौगले उपस्थित होते.
            कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून व स्वागत गीताने करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी श्री. नावडकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली. जगात भारतीय संविधानाची तोड कोणत्याही राष्ट्रामध्ये नाही त्याचा सर्वांनी अंगीकार करणे अपेक्षित आहे.
            माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. पाटील यांनी संविधान साक्षर ग्राम उपक्रमाचे कौतुक केले. व अशाच पद्धतीचे उपक्रम प्रत्येक गावात राबवावेत असे सांगितले. माध्य. शिक्षणाधिकारी श्री. लोहार यांनी मनोगत करताना संविधानाची आज समाजाला आसणारी गरज सर्व  लोकांनी समजून घेतली पाहिजे व आचरणात आणली पाहिजे व प्रत्येक शाळेमध्ये संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले पाहिजे असे मत व्यक्त केले.
            यावेळी संविधान साक्षर ग्राम अंतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धेतील  यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. वडणगे गावचे सरपंच श्री. चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री. सवाखंडे यांनी संविधान साक्षर उपक्रमाचा हेतू विशद केला. कार्यक्रमासाठी जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. घाटे  यांनी बार्टीच्या उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी शाहीर श्री. नायकवडी यांनी पोवाडा सादर केला 
            अंगणवाडी सेविका यांनी 'बेटी पढाओ बेटी बचाओ' या उपक्रमाची माहिती देऊन स्त्री भ्रूण हत्येविषयी शपथ दिली. यावेळी ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बार्टीच्या जिल्हा समन्वयक आशा रावण, आभार समतादूत किरण चौगुले व सूत्रसंचालन आर.बी. देवणे यांनी केले.
            कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे, विभागीय अधिकारी जागृती गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.